mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

महाराष्ट्रातील तेढ विसरून जा, देवपूर गावाने दाखवला खरा मार्ग : Forget the divide in Maharashtra, Devpur village has shown the true path

शेअर करा :

Forget the divide in Maharashtra, Devpur village has shown the true path : महाराष्ट्रातील तेढ विसरून जा, देवपूर गावाने दाखवला खरा मार्ग .

Forget the divide in Maharashtra, Devpur village has shown the true path

बुलढाणा 
दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री देवपूर गावात अज्ञात व्यक्तीने बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. महाराष्ट्रात तेढ असताना देवपूरने दाखवला एकतेचा आदर्श. बुलढाणा  जिल्ह्यातील  देवपूर हे छोटेखानी गाव आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरले आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला. राज्यभर अशाच प्रकारच्या अनेक घटनांमुळे सामाजिक तणाव, वाद आणि काही ठिकाणी हिंसक झगडेही झालेले असताना, देवपूरच्या ग्रामस्थांनी मात्र पूर्णपणे वेगळे आणि सकारात्मक उदाहरण घालून दिले आहे.
Forget the divide in Maharashtra, Devpur village has shown the true path
गावकऱ्यांची एकजूट आणि शिवभक्तीची भावना
पुतळा बसवल्याची बातमी समजताच गावातील सर्व स्तरातील लोक एकत्र आले. त्यांनी या पुतळ्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. हटवण्याची कारवाई होऊ नये, उलट तो कायम राहावा यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन शासनाकडे औपचारिक विनंती केली आहे. गावकरी म्हणतात, “हा पुतळा आमच्या गावाचा अभिमान आहे. अज्ञात भक्ताने केलेली ही शिवभक्ती आम्ही सर्वजण मानतो. येथे कोणताही वाद नको, फक्त एकता आणि आदर हवा.”
राज्यातील पार्श्वभूमी
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या उभारणीसंदर्भात अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी परवानगीशिवाय बसवलेल्या पुतळ्यांमुळे प्रशासनाने हटवण्याची कारवाई केली, तर काही ठिकाणी दोन गटांमध्ये संघर्ष झाले. अशा पार्श्वभूमीवर देवपूर गावाने दाखवून दिले आहे की, शिवरायांचे नाव एकत्र आणणारे आमचे गाव आहे, पुतळ्याची विटंबना करणारे  नाही.
देवपूरच्या या घटनेतून स्पष्ट होते की, खरी शिवभक्ती म्हणजे केवळ पुतळा उभारणे नव्हे, तर त्याला सर्वांच्या मनात स्थान देणे आणि समाजाला एकसंध ठेवणे. गावकऱ्यांनी प्रशासनाला साद घातली आहे की, पुतळ्याला अधिक भव्य स्वरूप देऊन त्याची कायमस्वरूपी जागा निश्चित करावी अशी  विनंती गावकर्यांनी प्रशासनाला केली  आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top