mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

विवेकानंद नगरात चोरट्यांचा धुमाकूळ : Thieves on the rampage in Vivekananda Nagar

शेअर करा :

Thieves on the rampage in Vivekananda Nagar : विवेकानंद नगरात चोरट्यांचा धुमाकूळ: सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Thieves on the rampage in Vivekananda Nagar


डोणगाव : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात, साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विवेकानंद नगरमध्ये नुकत्याच घडलेल्या चोरीच्या घटनांनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. एकेकाळी सुरक्षित आणि सुशिक्षित वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालून मोटारसायकल, धान्य आणि सोन्याची पोत लंपास केली. ही घटना नवनियुक्त ठाणेदारांसाठी एक मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

 

२८ जूनच्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी विवेकानंद नगरमधील काळे लेआउट आणि वडतकर लेआउटमध्ये प्रवेश केला. त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोऱ्या करून पोबारा केला. वडतकर लेआउटमध्ये रसूल शाह जुम्मा शाह यांची हिरो स्प्लेंडर (MH 28 BZ 1972) ही मोटारसायकल चोरट्यांनी पळवली. विशेष म्हणजे, त्यांनी इतर काही मोटारसायकली तपासल्या, परंतु त्यांची स्थिती चांगली नसल्याने त्या तशाच सोडून दिल्या. यावरून चोरट्यांनी केवळ चांगल्या स्थितीत असलेल्या वस्तूच निवडल्याचे स्पष्ट होते.

त्याच रात्री, चोरट्यांनी काशीराम नत्थू जामकर यांच्या घराचे कुलूप तोडून २० हजार रुपये रोख आणि धान्य लंपास केले. याव्यतिरिक्त, काळे लेआउटमध्ये हिम्मत काकडे हे पुण्याला गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील अलमारीत ठेवलेली सोन्याची पोत चोरट्यांनी चोरली. धक्कादायक बाब म्हणजे, चोरट्यांनी काकडे यांच्या भाडेकरूच्या घराला बाहेरून कडी लावून टाकली, ज्यामुळे त्यांना आवाज ऐकूनही काहीच करता आले नाही.

 

या चोऱ्या घडत असताना हिवरा आश्रम परिसरात जोरदार पाऊस सुरू होता, ज्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरटे पूर्ण तयारीने आले होते. त्यांच्या डोक्यात टोपी, डोळ्यांवर चष्मा, अंगात जॅकेट आणि चेहऱ्यावर मास्क होता. यावरून त्यांची पूर्वनियोजित तयारी स्पष्ट होते. यापूर्वीही हे चोरटे ग्रामीण रुग्णालय हिवरा आश्रम येथे रेकी करताना दिसले होते, अशी माहिती समोर आली आहे.

 

या घटनेमुळे विवेकानंद नगरातील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरट्यांनी आजूबाजूच्या लोकांचे घराबाहेर असलेले जोडेही पायात घालून पाहिले, यावरून त्यांची निर्ढावलेली वृत्ती दिसून येते. या घटनांमुळे विवेकानंद नगरात सध्या भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. नवनियुक्त ठाणेदारांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे आणि परिसरातील शांतता व सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top